“लोक नंतर अशांना दारातही उभे करणार नाहीत”, नितीन गडकरींची बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Nitin Gadkari’s harsh criticism shivsena rebel MLAs)

महाराष्ट्रातील निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जनतेला एक-दोन वेळा मूर्ख बनवता येऊ शकते, पण वारंवार ते शक्य नाही. लोकांना फसवणुकीची जाणीव झाल्यास ते अशांना दारात देखील उभे करणार नाहीत”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “या युगात गुणवत्ता फार महत्वाची आहे. राजकारण असेल किंवा व्यापार गुणवत्तेला पर्याय नाही. जे लोक ‘शॉर्टकर्ट’ चा अवलंब करतात, त्यांना भविष्य नाही. लोकांना एक-दोन वेळा मूर्ख बनवले जाऊ शकते. पण वारंवार ते शक्य नाही.”

“जेव्हा लोकांना आपली फसवणुक झाली आहे, या गोष्टीची जाणीव झाल्यास ते अशांना दारात देखील उभे करणार नाहीत”, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राकीय वर्तुळात स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा भाजपला सध्याच्या राजकारणावरून सुनावले आहे.

शिंदे गटातील आमदार आज मुंबईला येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटातील या बंडखोर आमदारांना मुंबईला आणण्यासाठी भाजपने विशेष प्लॅन तयार केला असल्याची माहिती मिळत आहे. एका विशेष विमानाने या सर्व आमदारांना मुंबईला आणले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिक झाले आक्रमक
येत्या चोवीस दिवसांत शिंदे आणि ठाकरे गटापुढे कोणते पर्याय? वाचा कायदा काय सांगतो…
बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले