टिम इंडीयाच्या ‘या’ खेळाडूवर प्रचंड नाराज आहेत कपिल देव; म्हणाले, त्याला लाज वाटत होती…

टीम इंडिया 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत असून, या जोरावर त्यांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. T20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाची कामगिरी चांगली असूनही माजी कर्णधार कपिल देव भारतीय संघातील खेळाडूच्या कामगिरीवर अजिबात खूश नाहीत.(Rahul Dravid, Captain Rohit Sharma, Virat Kohli, Team India)

कपिल देव यांनी या खेळाडूच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे. भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांच्या मते ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ही टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी आहे. आता रविचंद्रन अश्विनलाही विकेट मिळत आहेत, त्यामुळे या ऑफस्पिन गोलंदाजाला स्वतःची लाज वाटली पाहिजे, असेही कपिल देव म्हणाले.

एका खासगी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देव यांनी रविचंद्रन अश्विन यांच्यावर सडकून टीका केली आहे. रविवारी झालेल्या T20 विश्वचषक 2022 च्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने झिम्बाब्वे विरुद्ध 4 षटकात 22 धावा देऊन 3 बळी घेतले. या कामगिरीबद्दल कपिल देव यांनी रविचंद्रन अश्विनची खिल्ली उडवली.

कपिल देव म्हणाले, ‘आतापर्यंत मी रविचंद्रन अश्विनमध्ये आत्मविश्वासासारखी कोणतीही गोष्ट पाहिली नाही. अश्विनने विकेट घेतल्या तरी या विकेट्स मिळाल्या असे वाटले नाही.

कपिल देव म्हणाले, ‘प्रत्यक्षात झिम्बाब्वेचे फलंदाज अशा पद्धतीने आऊट झाले की अश्विनलाच विकेट घेण्याची लाज वाटली आणि तो तोंड लपवत होता. विकेट्स घेतल्याने तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो, पण आम्हांला माहीत असलेला अश्विन सध्या त्या अंदाजात नाही.

महत्वाच्या बातम्या
रोहितचे ‘हे’ 3 खतरनाक खेळाडू इंग्लंडसाठी बनतील काळ, भारताला थेट फायनलमध्ये पोहचवतील
बॅटने काच फोडली, मैदानावर केली मारामारी, कर्णधारपदही गेले; खूपच विचित्र आहे सूर्याची कहाणी
काय आहे टीम इंडियाचा फ्लाइट प्लॅन? विराट, रोहित, राहुल द्रविडने का सोडली बिझनेस क्लासची आलीशान सीट?