दिल्ली | राज्यसभा खासदारांनी २२ जुलैला शपथ घेतली. त्यावेळी उदयनराजेंनी इंग्रजी मधून शपथ घेतली आणि शेवटी जय भवानी, जय शिवाजी ! आणि जय हिंद, जय महाराष्ट्र ! अशा घोषणा दिल्या होत्या.
त्यानंतर राज्यसभा चेअरमन वेंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिला की, तुम्ही सदनात नवीन आहात म्हणून सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही. फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही हे भविष्यात लक्षात असुद्या. यानंतर उद्यानराजेंनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
आक्षेप शिवसेना, राष्ट्रवादीने घेतला. जर शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का. कृपया करून हे प्रकरण वाढवू नका. काय क झालंय ते सगळं तुम्ही व्हीडिओ फुटेजमध्ये पाहू शकता. असं उदयनराजे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांचे वर्तन चुकीचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता. सभेत कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला नाही.
राज्यसभेत कुठल्याही प्रकारे महाराजांचा अवमान झाला नाही. माझा स्वभाव बघून मी ऐकून घेईन असं वाटतं का ? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं नायडू म्हणाले होते. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला. राज्यघटनेनुसार अशा घोषणा देता येणार असं त्यांनी सांगितलं.
नायडू म्हणाले की, घोषणा राज्यघटनेला धरून नाहीत. आदरणीय पवार साहेब तिथेच बसले होते त्यांनाही तुम्ही विचारू शकता काय झालं ? जे घडलं नाही ते भासवण्याचा प्रयत्न करू नका. ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, असं उदयनराजे म्हणाले.