Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर वारस नोंदणी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

October 19, 2020
in ताज्या बातम्या, इतर
0
कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर वारस नोंदणी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
ADVERTISEMENT

आपल्या कुटुंबात कोणीतरी कुटुंबप्रमुख असतो ज्याच्या नावाने पूर्ण घर ओळखले जाते. तसेच पूर्ण संपत्ती शक्यतो त्याच व्यक्तीच्या नावावर असते. जसे की शेतजमीन, बंगला किंवा घर अगदी गाडीपासून सर्व गोष्टी त्याच व्यक्तीच्या नावावर असतात.

पण त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर असा प्रश्न उभा राहतो की, ह्या संपत्तीचे समान भाग कसे करायचे? पण याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वारसा नोंद. जर तुम्ही वारसा नोंद केली नाही तर भाऊबंद किंवा इतर नातेवाईक कर वाईट वृत्तीचे असतील तर त्यांच्याकडून तुमच्या पूर्वजांच्या संपत्तीला धोका निर्माण होऊ शकतो.

वारस नोंद वेळेवर करणे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला वारस नोंदबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्या वेळेस आपण वारस नोंदणी करतो त्यावेळी त्याची नोंद सगळ्यात आधी नमुना ६ क या रजिस्टरमध्ये होते.

कोणाचे नाव वारस म्हणून लावायचे याबाबत ठराव मंजूर केला जातो. यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. जर कोणाला याबाबत काही तक्रार असेल तर त्यासाठी नोटीस पाठवली जाते. जर तक्रार नसेल तर मंडळअधिकाऱ्याच्याद्वारे किंवा तहसीलदार स्थानिक रिपोर्टच्या आधारावर सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी परवानगी देतो.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत वारस नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करताना त्यांच्या नावावर किती संपत्ती होती, त्यांचा किती तारखेला मृत्यू झाला, त्यांना एकूण किती वारसदार आहेत ही सगळी माहिती लिहावी लागते.

तसेच मृत्यू झालेल्या माणसाच्या नावावर असलेल्या जमीनीचे ८ अ चे उतारे आणि शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागते. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीबरोबर काय नाते आहे? आणि त्या वारसाचा सध्याचा पत्ता काय आहे? ही माहिती भरावी लागते.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मृत्यू झालेली व्यक्ती कोणत्या धर्माची आहे? कायद्याप्रमाणे वारसा हक्क जो आहे त्याची अंमलबजावणी केली जाते. मृत्यूचा दाखला काढून आणायचा. वारस नोंदणीसाठी अर्ज देताना त्याबरोबर प्रतिज्ञापत्र, त्यानंतर ८ अ चे उतारे ज्यामध्ये संपुर्ण मालमत्तेची माहिती असेल अशी सर्व कागदपत्रे द्यावी लागतात.

यानंतर सर्व वारसांना बोलावले जाते. मग गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांच्या सल्ला घेतला जातो आणि एक ठराव केला जातो. ठराव मंजूर झाल्यानंतर फेरफार रजिस्टरमध्ये नोंदणी केली जाते. यानंतर सर्वाना नोटीस बजावली जाते.

शेवटी सगळ्या वारसदारांची नोंद केली जाते आणि जर त्यामध्ये काही चुका आढळून आल्या तर ही नोंद रद्दही केली जाऊ शकते. तर ही होती वारस नोंदणी प्रक्रियेची पूर्ण माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा.

Tags: High courtmarathi articlemarathi informationMulukhMaidanPropertyकुटुंबप्रमुख मृत्यूजमीननातेवाईकप्रॉपर्टीभावंडेमराठी माहितीवारस नोंदणीवारसदारसंपत्ती
Previous Post

खरचं भात खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या यामागचे सत्य

Next Post

मुख्यमंत्री गावातच आले नाही तर नुकसान दिसणार कसे; पुलावर बोलावल्याने ग्रामस्थ संतापले

Next Post
मुख्यमंत्री गावातच आले नाही तर नुकसान दिसणार कसे; पुलावर बोलावल्याने ग्रामस्थ संतापले

मुख्यमंत्री गावातच आले नाही तर नुकसान दिसणार कसे; पुलावर बोलावल्याने ग्रामस्थ संतापले

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये ७००० पदांसाठी भरती, असा करा अर्ज

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये ७००० पदांसाठी भरती, असा करा अर्ज

February 26, 2021
खुप वाईट होता बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवट; गळा दाबून करण्यात आली होती हत्या

खुप वाईट होता बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवट; गळा दाबून करण्यात आली होती हत्या

February 26, 2021
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

February 26, 2021
शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

February 26, 2021
ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

February 26, 2021
जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

February 26, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.