Raj Thackeray : राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष *राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी हिंदी सक्तीला तीव्र विरोध दर्शवत राज्य सरकारला थेट इशारा दिला. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे तिची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही, असं ठाम मत त्यांनी मांडलं. तसंच, हिंदी जर महाराष्ट्रात सक्तीची करत असाल तर तीच सक्ती दक्षिण भारतात का नाही? असा सवाल करत त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.
गुणरत्न सदावर्ते यांचा प्रत्युत्तरात्मक हल्ला
राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या वक्तव्यावर *वकील गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी जोरदार टीका* करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी बोलताना सदावर्ते (Gunaratna Sadavarte)म्हणाले की, “राज ठाकरे यांची भाषा ही लोकांच्या विरोधात आहे. त्यांनी जी धमकी दिली आहे, त्याचं आम्ही संविधानाच्या माध्यमातून उत्तर देऊ.”
तसंच ते म्हणाले, “राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या खिशातून हिंदी शिकवण्यासाठी पैसे जाणार आहेत का? मग विरोध का? नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत असताना गरिबांच्या मुलांनी स्थानिक शाळेतच शिकावं का? आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असलेल्या संधीचं स्वागत करतो.”
राज्य शासनाच्या निर्णयाचं समर्थन
गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी राज्य शासनाने *पाचवीपर्यंत हिंदी शिक्षण अनिवार्य केल्याच्या निर्णयाचे समर्थन* करत त्याचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषा शिकायला मिळाव्यात, ही संधी त्यांच्या विकासासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. गल्फपासून ते चीनपर्यंत अनेक ठिकाणी ही भाषा समजली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी शिकण्याची संधी मिळणं हा आनंदाचा विषय आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
“राज ठाकरे यांचा विचार बालिश”
सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला *“बालिश आणि गल्लीतल्या पक्षांसारखी”* भूमिका असल्याचे म्हटलं. “राज ठाकरे यांना संविधान समजण्याची गरज आहे. जो कोणी ज्ञानाच्या आड येईल, तो देशाचा शत्रू आहे. आम्ही असा कोणताही विरोध संविधानिक मार्गाने थांबवू,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
‘मनसे स्टाईल’ आंदोलनांना इशारा
राज ठाकरे यांनी मनसे स्टाईल आंदोलन करण्याची सूचना दिल्याच्या पार्श्वभूमीवर, सदावर्ते यांनी स्पष्ट केलं की, “भारत हे तालिबानी राष्ट्र नाही. संविधानाच्या चौकटीतच सर्व गोष्टी चालतील. आम्ही कोणालाही अशा आंदोलनांच्या माध्यमातून मुलांच्या प्रगतीच्या आड येऊ देणार नाही.”
‘माघार घेण्याचा इतिहास लक्षात ठेवा’
सदावर्ते यांनी याआधी राज ठाकरे यांनी बँकांमधील हिंदी बाबत केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली आणि सांगितलं की, “त्यांनी त्यावेळीही माघार घेतली होती. आता देखील तसेच घडेल. जनता आणि पालक राज ठाकरे यांच्याबरोबर उभे राहणार नाहीत.”
एकंदरीत, राज ठाकरे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात हिंदी सक्तीवरून निर्माण झालेला वाद आता केवळ भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संविधान, शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक भान या पातळीवर पोहोचला आहे.* यामध्ये राजकारण किती आणि विद्यार्थीहित किती, याचा निर्णय मात्र जनतेला घ्यायचा आहे.
gunaratna-sadavarte-again-teases-raj-thackeray