bachhu kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल पत्रकार परिषद घेत मोठं – मोठे गौप्यस्फोट केले. अन् राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. कडू यांच्या वक्तव्यानंतर आता शिंदे गटातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले असल्याच बोललं जातं आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या रवी राणा यांच्या आरोपांमुळे त्रस्त झालेल्या बच्चू कडू यांनी थेट १२ आमदारांसह सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘रवी राणांनी माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यामुळे आता शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. आता शिंदे गटातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांच्यासंदर्भात एक सूचक वक्तव्य केलं आहे. कडू यांनी सबुरीने घ्यावे ते लवकरच मंत्रीपदावर असतील असे सूचक वक्तव्य केसरकर यांनी केलं आहे.
पुढे बोलताना केसरकर यांनी म्हंटलं आहे की, बच्चू कडू हे एक जेष्ठ नेते आहे. सध्या त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नसल्याच केसरकर यांनी म्हंटलं आहे. यामुळे आता यावर कडू काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा काय म्हणाले बच्चू कडू..?
बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे की, ‘समर्थनासाठी खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्या राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे, अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
पुढे बोलताना कडू यांनी म्हंटलं आहे की, ‘एकनाथ शिंदे साहेब म्हणायचे की, आमचे पन्नास आमदार पडू देणार नाही, पडण्याचा विषयचं नाही, कधी उभं राहणार, असा प्रश्न निर्माण झालाय म्हणून हा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे, असं बच्चू कडू यांनी स्पष्टच म्हणाले आहेत.
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा